आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे. अशी गर्जना योगी आदित्यनाथ यांनी केली.
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे.त्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. “तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही,” असं ओवेसी म्हणाले.
“तुमची संपूर्ण पिढी संपून जाईल पण शहाराचं नाव हैदराबादच राहणारआहे. निवडणूक हैदराबाद आणि भाग्यनगरदरम्यान आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हैदराबादच नाव बदलू नये तर एमआयएमलाच मतदान करा,” असं आवाहनही ओवेसी यांनी केलं. “ते (भाजपा) नाव बदलू इच्छित आहेत.एका सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिलं.
त्यांना सर्व जागांची नावं बदलायची आहेत. तुमचं नाव बदललं जाईल पण हैदराबादचं नाव बदललं जाणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आणि हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं म्हणतात. तुम्ही काय ठेका घेतला आहे का?,” असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.